
अभिनेते चिरंजीवी यांचा भाऊ पवन कल्याण हा प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी आहे. पवन कल्याण आंध्र प्रदेशातीळ जनतेमध्ये तुफान लोकप्रिय आहे. त्याचा जनसेना नावाचा पक्ष देखील आहे. या पक्षाचे ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अभिनेता चिरंजीवीने देखील २००८ साली ‘प्रजा राज्यम’ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. २००९च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे १८ आमदार निवडून आले होते. मात्र, २०११ साली त्यांनी ‘प्रजा राज्यम’ पक्ष कॉंग्रेसमध्ये विलिन करण्याचा निर्णय घेतला. नंतर कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढलेले चिरंजीवी राज्यसभा खासदार आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री देखील झाले. मात्र, काही कालावधीनंतर चिरंजीवी यांनी राजकारणच सोडण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ते राजकारणापासून दूर असून, राजकारणाात परतण्याचा काही विचार नसल्याचं सांगतात.








