
परशुराम आणि कुंभार्ली घाटात दरड कोसळली असून त्यामुळं मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. नदीकिनारी राहणाऱ्या आणि दरडग्रस्त परिसरातील ३९५ गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच राजापूर, कोदवली आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांपासून कोकणातील रत्नागिरी, लांजा, मंडणगड आणि गुहागर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं प्रशानाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.





