
१,३१५ मीटर लांबीचा हा पूल एका मोठ्या प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याचे उद्दीष्ट भारतीय रेल्वेची काश्मीर खोऱ्यात कनेक्टीव्हीटी वाढवणे आहे. उत्तर जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ व खडतर भूभागामुळे या प्रकल्पाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. डिसेंबर २००४ मध्ये या प्रकल्पाला अधिकृत मान्यता मिळाली आणि मार्च २०२३ पर्यंत ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाले.







