
भिवंडी इथं भाजपनं कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी पुढील सर्व निवडणुकांत विजयाचा विश्वास बोलून दाखवला. ‘भाजप महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष आहे आणि यापुढंही राहील. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप अव्वल कामगीरी करेल. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपला मिळणाऱ्या जागांपैकी ८० टक्के म्हणजेच, १५२ जागांवर भाजपा विजयी होईल, असंही ते म्हणाले.



