
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प असल्यामुळे लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, मध्यम वर्ग, छोटे उद्योजकांसाठी महत्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ६ हजारांवरून ९ हजार रुपये केली जाऊ शकते. मोठया कंपन्यांच्या प्राप्तिकर १५ टक्के सवलत योजनेला मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








