
दिलीप कुमार यांना मधुबाला यांच्याशी लग्न करायचे होते. पण, मधुबाला यांनी त्यांच्या वडिलांसोबतचे सगळे संबंध तोडावे अशी त्यांची इच्छा होती. ‘नया दौर’ चित्रपटातून मधुबाला यांना काढून टाकल्यानंतर मधुबाला यांचे वडील अताउल्ला यांनी बीआर चोप्रा यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून बीआर चोप्रा यांनीही कायद्याची मदत घेतली होती. त्यावेळी दिलीप कुमार यांनी कोर्टासमोर मधुबालावरचे प्रेम व्यक्त केले होते आणि त्यांचे तिच्यावर किती प्रेम आहे, हे सर्वांना मनोभावे सांगितले होते. मात्र, या कोर्ट केसनंतर त्यांचे नाते तुटले. दिलीप कुमार यांनीच मधुबालाला साथ दिली नाही, असे म्हटले जाते. यानंतर ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांसाठी अनोळखी असल्यासारखे वागत होते.








