
संजीव कुमार यांनी चित्रपटांमध्ये खूप नाव आणि पैसा कमावला, पण त्यांच्या आयुष्यातील शेवटची वेळ चांगली गेली नाही. शेवटच्या काळात ते एकटेच होते आणि ते जगण्याची इच्छाशक्ती गमावून बसले होते. संजीव कुमार यांचे लग्न झाले नव्हते. याची दोन कारणे आहेत. लोक म्हणतात की, ते हेमा मालिनींवर खूप प्रेम करत होते. मात्र, ‘शोले’च्या सेटवर धर्मेंद्र आणि हेमा यांच्यातील जवळीक वाढली. त्यामुळे संजीव कुमार यांचे हृदय तुटले होते. त्यानंतर त्यांनी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला. तर, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना एका ज्योतिष्याने सांगितले होते की, ते वयाची पन्नाशी ओलांडणार नाहीत. यामुळे त्यांनी आधीच आपल्या मृत्यूचा अंदाज बांधला आणि कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.