
सेटवर वाद झाल्यानंतर त्यावेळी सनी देओल इतका संतापला होता की, त्याने आपले दोन्ही हात खिशात ठेवल्याने त्यांच्या पँटचे खिसेच फाटले होते. अर्थात त्याने रागाने आपल्या हाताच्या मुठी इतक्या जोराने आवळल्या की, खिसे आणि पँटचं फाटली. सनीचा राग पाहून सगळ्यांनीच सेटवरून काढता पाय घेतला होता. खलनायक हा चित्रपटाचा हिरो कसा ठरू शकतो, असा मुद्दा सनी देओलने उपस्थित केला होता. मात्र, चित्रपट तसाच शूट झाल्यानंतर सनीने शाहरुखशी बोलणे टाकलेच. मात्र, त्याने नंतर यशराजचा एकही चित्रपट केला नाही.








