
प्रेम,क्षमा आणि दुसऱ्या संधीची हृदयस्पर्शी कथा म्हणजे चित्रपट’बोल हरी बोल’.स्वतःच्या सुखवाहू जीवनाची स्वप्न पाहताना,वडिलांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हरी पोंक्षेच्या जीवनावर चित्रपटाची कथा आधारीत आहे. हरीचे वडील,मनोहर पोंक्षे हे सरकारी कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असून,ते एका चाळीत राहतात. मुंबईत स्वत:चा फ्लॅट घेण्याचे त्याचे स्वप्न आहे आणि हरीने त्याचे हे स्वप्न पूर्ण करावे अशी त्याची इच्छा आहे. परंतु बाप-लेकाची ही जोडी शेरास-सव्वाशेर आहे. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच एकमेकांच्या स्वभावासोबत जुळवून घेण्यासाठीची धडपड आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.






