
या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण८ जण प्रवास करत होते. त्यामध्ये३ पुरुष,२ महिला,२ लहान मुली आदिंचा समावेश होता.मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने ही बोट पलटली. या वादळी वाऱ्यामुळे पाण्यात लाटा निर्माण झाल्या व त्यामुळे बोट उलटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटना समजतात बचाव कार्यासाठी महसूल पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ पोहचले आहेत.





