Bird Flu in Maharashtra: लातूरमधील उदगीर शहरामध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात कावळे मरुन पडण्याच्या घटना वाढल्या होत्या. प्रशासनाने याची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू मुळे झाल्याहे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे लातूर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ज्या परिसरात कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्य ठिकाणी १० किमी क्षेत्र हे ‘अलर्ट झोन’ घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील कुक्कुटपालन करणाऱ्यांचे सर्वेक्षण केलं जाणार आहे. तसेच त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.



