
का झालं लव आणि साईचं भांडण?
लव कटारिया आणि साई केतन राव सर्वांसोबत बसले असताना दोघांमध्ये वाद झाला. त्यांच्यातील वाद वाढला, तेव्हा साई केतन रावने लव कटारियाला असे काही म्हटले, जे त्याला आवडले नाही. यानंतर लव कटारियानेही साईला काही अपशब्द उच्चारले, ज्यावर तो संतापला आणि त्याला मारहाण करण्यासाठी त्याच्या दिशेने धावत गेला. मात्र, क्षणाचाही विलंब न लावता रणवीर शौरी धावत मध्ये आला, ज्यामुळे ही मोठी घटना टळली. मात्र, यानंतरही साई नियंत्रणात आला नाही. यानंतर बाकीच्या लोकांनीही त्याला रोखले. कृतिकाने त्याला समजावलं की, अरमानसारखी चूक करू नकोस. यानंतर साई रागाच्या भरात घरातील खुर्च्या फोडताना दिसला.