
या व्हिडीओमध्ये पायल म्हणतेय की, ‘मला लोक खूप त्रास देत आहेत. गेल्या काही दिवसांत बरंच काही घडलं आहे. जे सतत ट्रोल करत आहेत, त्यांना असं वाटतं का, मी माझ्या चार मुलांसह मरून जावं? मी आजच्या इतकी अस्वस्थ कधीच झाले नव्हते.’ ती पुढे म्हणते, ‘आता मी मुलांसोबत वेळ घालवावा असा विचार करत आहे. ना मी बिग बॉस पाहत आहे, ना फोन किंवा इन्स्टाग्राम बघत आहे. कारण, सतत लोक कमेंट करून म्हणत आहेत, की मी चुकीचे केले आणि अरमानला घरातून बाहेर काढले जावे. अहो, मग त्याला काढून टाका ना… मी कधी नकार दिलाय? त्यांना बाहेर काढा, तो बाहेर येईल आणि बाळाची काळजी घेईल. मला एकटं राहून कंटाळा आलाय. अरमानला कशाला गोलूला देखील बाहेर काढा. उगाच आमच्या परिवाराला द्वेषाचा सामना करावा लागत आहे. लोक असे वागत आहेत की, जणू आम्ही सगळं काही चुकीचे केले आहे.’








