
दरम्यान, फिनालेपूर्वी या शोमध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यात माध्यमांनी सर्वांना धारदार प्रश्न विचारले. प्रसारमाध्यमांनीही स्पर्धकांना एकमेकांसमोर आणले. यावेळी अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांनाही मीडियाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. एकीकडे माध्यमांनी अरमानवर टीका केली. तर, कृतिकाला ‘पायलचं घर फोडणारी बाई’ म्हटले जात असल्यावर तिला काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी कृतिकाला विचारण्यात आले की, अरमान तिच्यावर जास्त प्रेम करतो की पायलव?. यावर कृतिकाने दिलेले उत्तर सध्या चर्चेत आहे.