
काय म्हणाले प्रेक्षक?
‘चांगली जिरवली रितेश भाऊ यांची… आज जान्हवी, अरबाज आणि वैभवची… खासकरून त्या जान्हवीची. अगदी आमच्या मनातलं बोललात’, ‘धन्यवाद रितेश भाऊ. खऱ्याला न्याय आणि खोट्याला शासन दिल्याबद्दल. आपल्याकडून हीच अपेक्षा सबंध महाराष्ट्राला होती. प्रत्येकाला त्याची त्याची जागा दाखवून दिलीत आपण’, ‘दादागिरी करून, पराभव पत्कराता येत नाही, ते कधीच यशस्वी होत नाही हे रितेश भाऊ दाखवून दिले’, ‘जान्हवीची चांगली जिरवली भाऊंनी. धन्यवाद भाऊ हीच अपेक्षा होती’, ‘जाळ आणि धूर मस्तच काढला. हिच्या बाबाचं घर नाही हे’, ‘वर्षा मॅम खूप मोठ्या अभिनेत्री. त्यांचा मान सन्मान आदर व्हायला पाहिजे, ही जी नवीन लोकं आहेत, ज्यांना कुणी ओळखत नाही, ती लोकं वर्षा मॅमला घाण बोलतात, असं ऐकावं वाटतं नाही…’ अशा शब्दांत प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.