
काय म्हणतायत प्रेक्षक?
अरबाजच्या वागण्याने संतापलेल्या प्रेक्षकांपैकी एकाने लिहिले की, ‘कलर्समराठी मला एक सांगायचंय आवर्जून जेव्हा महाराज बाहेर जाताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हंटले, तेव्हा सगळे बोलत होते तेव्हा तो ‘अरमाज’ मात्र हाताची घडी घालून गप्प उभा होता. अशा वृत्तीच्या लोकांना काय बोलावं, याने हात जोडले असते ना सगळ्या महाराष्ट्राची मने जिंकली असती. पण, आता त्याला मत देण्यासाठी मला नाही वाटत कुणाचे हात धजावतील.’ आणखी एकाने लिहिले की, ‘अरे हा अरब कशाला घेतला, ज्याच्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जय येऊं शकत नाही, ते महाराष्ट्र काय देशात राहायच्या लायकीचे नाही. त्याच्या तोंडावर बघयाच महाराजांची नावे घेतल्यावर बारा वाजले होते. तू नाही म्हणाला तरी काही फरक नाही पडत महाराजांना… त्यांची उंची खूप मोठी आहे. अशी लोकं फक्त बिग बॉसच्या घरातून पहिली जायला पाहिजे अन् जेव्हा नॉमिनेट होईल घराबाहेर नक्की जाणार. याच्यापेक्षा सुरस छोटा पुढारी धनंजय किंवा त्या घरातील सर्व माणसे परवडली. पण, हा नको. बाकी पुरुषोत्तम दादा यांनी घरात राहून जी चांगली भूमिका मांडली अन् ते लोकांना पटलंही! दादा अजून घरात पाहिजे होते. जय जय राम कृष्ण हरी माऊली,छत्रपती शिवाजी महाराज की जय!’








