
पवित्रा पुढे म्हणाली, ‘बिग बॉसनंतरचे पहिले दीड वर्ष माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. तो दीड वर्षाचा काळ माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. मी डिप्रेशनमध्ये जात होते. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. या काळात मला माझ्या जवळच्या लोकांनी सावरले, नाहीतर काय झाले असते माहित नाही. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर लोकांचे करिअर यशाच्या शिखरावर जाते. पण, त्यावेळी मी माझ्या कुटुंबाकडून पैसे घेत होते. काम होतं, पैसेही होते. मात्र, मला एकामागून एक हवे तसे प्रोजेक्ट मिळत नव्हते. कोविडच्या काळात मी कशासाठीही संघर्ष केला नाही. मी खूप आनंदी होतो. पण, बिग बॉस नंतरचा काळ माझ्यासाठी खूप वाईट गेला आहे.’








