
पुढे त्याने कोल्हापूरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला याबद्दल बोलत “आजच्या धकाधकीच्या जीवनात थोडे थांबणे, वेळ घेणे आवश्यक आहे असे मला वाटते. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने कोल्हापुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मला तिथे छान वाटते, तिथे ताजी हवा आहे. मला मुंबई खूप आवडते. पण तिथून काम करणे गरजेचे राहिलेले नाही. आता मी कोल्हापूरहून मुंबईला काम करण्यासाठी येतो, माझे काम झाले की कोल्हापूरला परत जातो” असे म्हटले.







