हिवाळ्यात आल्याचा आहारात अधिक वापर केला जातो. आले चविष्ट तर आहेच, पण त्याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. चहा, कोशिंबीर, भाज्या आणि रसामध्ये अद्रक मिसळून याचा वापर केला जातो. हिवाळ्यात आल्याचे पाणी पिणे विशेषतः लाभदायक आहे. ते शरीराला उष्णता देते, प्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव करते.
हिवाळ्यात आल्याचे पाणी पिण्याचे फायदे
1. प्रतिकारशक्ती वाढवते
आल्यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. हिवाळ्यात फ्लू आणि इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी आल्याचे पाणी फायदेशीर आहे.
2. वजन नियंत्रणात ठेवते
आल्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म आहेत, जे शरीरातील चरबी कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात वाढणारे वजन नियंत्रित ठेवता येते.
3. हृदयाचे आरोग्य सुधारते
आल्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदय निरोगी ठेवतात.
4. दाहक-विरोधी प्रभाव
आल्याचे पाणी शरीरातील सूज कमी करते आणि रक्तातील संतुलन राखते. यामुळे हिवाळ्यात शरीराला उर्जा मिळते.
आल्याचे पाणी कसे तयार कराल?
1. एका भांड्यात २ कप पाणी घ्या.
2. त्यात किसलेला किंवा ठेचलेला १ इंच आल्याचा तुकडा घाला.
3. २-३ मिनिटे मंद आचेवर उकळवा.
4. थंड झाल्यावर गाळून कोमट प्या.
हिवाळ्यात नियमित आले पाण्याचे सेवन करा आणि निरोगी रहा!
WhatsAppवरून समभार