
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला मतदारसंघ बारामतीत सातत्याने जनसंपर्क वाढवत आहेत. मात्र, महायुतीतील मित्रपक्ष भाजपचे कार्यकर्ते प्रचारात दिसत नसल्याचीही चर्चा आहे. याबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी घडू लागल्या आहेत. बारामतीतील भाजप कार्यकर्त्यांनी तटस्थ भूमिका घेतली असून अप्रत्यक्षरित्या अजित पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली जात असल्याचे समजते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या समर्थकांना विजयी करण्यासाठी ‘दादा’ आम्हाला पराभूत करतील, मग आम्ही त्यांना पाठिंबा का द्यायचा, अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे.