
बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (Aanti Terrorism Squad) अटक केली आहे. पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या जुहू युनिटने नुकतीच ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रियाज हुसेन शेख (वय ३३), सुलतान सिद्धिया शेख (नय ५४), इब्राहिम शफिउल्ला शेख (वय ४४) आणि फारुख उस्मानी शेख (वय ३९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.







