
सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षणाबाबत शेख हसीना सरकारच्या भूमिकेविरोधात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशाची राजधानी ढाका, बोगरा, पबना, रंगपूर, मगुरा, कोमिला, बरिसाल आणि फेनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून बांगलादेशात जाऊ नये असे आवाहन भारत सरकारने केले आहे. दरम्यान, वाढत्या हिंसचाराच्या पार्श्वभूमीवर देशात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट देखील बंद करण्यात आले आहे. आंदोलकांना थोपवण्यासाठी लष्कर रस्त्यावर उतरलं आहे.







