Bangladesh Crisis : बांगलादेशात हिंसाचारात ६५० नागरिकांचा बळी, हिंदूवर झाले हल्ले; UN च्या अहवालात धक्कादायक माहिती

0
3
Bangladesh Crisis : बांगलादेशात हिंसाचारात ६५० नागरिकांचा बळी, हिंदूवर झाले हल्ले; UN च्या अहवालात धक्कादायक माहिती


पारदर्शक तपासाची गरज

अहवालानुसार देशातील या विविध घटनांची परदर्शन आणि निष्पक्ष चौकशी करण्याची गरज आहे. यात न्यायबाह्य हत्या, मनमानी अटक, नजरकैदेत, अपहरण छळ आणि वाईट वागणूक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध यांचा समावेश आहे. ५ ऑगस्ट रोजी हसीना यांनी राजीनामा दिल्यावर देशात लूटमार, जाळपोळ आणि हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले झाले. याव्यतिरिक्त, माजी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांविरुद्ध आणि पोलिसांवर देखील बदला घेण्याच्या हेतूने हल्ले झाले. कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यावर देखील या अहवालात भर देण्यात आला आहे. तसेच जीवितहानी, हिंसाचार आणि सूडाच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली आहे.



Source link