
१९०६मध्ये वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी ते आपल्या पहिल्याच नाटकात ‘शकुंतला’च्या रूपात रंगमंचावर पोहोचले, तेव्हा त्यांना पाहून सगळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. नाजूक हातांनी पदर ओढणे, चेहऱ्यावरील हावभाव आणि स्त्री सुलभ लज्जेचा भाव.. त्यांनी स्त्री पात्र इतक्या ताकदीने साकारले की, पाहणारा प्रत्येक व्यक्ती प्रथमदर्शनी फसला. ‘सौभद्रा’, ‘मान-अपमान’, ‘विद्याहरण’ आणि ‘स्वयंवर’ यांसारख्या डझनभर नाटकांमध्ये त्यांनी कधी नंदिनी, कधी सुभद्रा, भामिनी तर कधी देवयानी आणि रुक्मिणी बनून लोकांची मने जिंकली.







