
आजवर मी कधीही कुणाचा पाठिंबा घेतला नाही. कुणाला पाठिंबा दिला नाही. मी स्वतंत्र लढलेलो आहे. सरकार आणि निवडणूक यात फरक असतो. सरकारमध्ये सहभागी होताना, आम्ही आमच्या मतदारसंघाच्या सोयीने सहभागी झालो. भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी आम्हाला गृहीत धरावे किंवा धरू नये, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही काय पाऊल पुढे टाकावं तो आमचा निर्णय आहे, असे कडू म्हणाले.





