
पुढे त्याने राष्ट्रीय पुरस्काराचा उल्लेख करत तो म्हणाला, “राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पुरस्कार मिळावा या उद्देशाने मी सिनेमात कधीच काम करीत नाही. काम केलेलेही नाही. प्रेक्षकांना आवडेल, भावेल अशाच नवनवीन भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी करत असतो.” त्यानंतर त्याने नव्या (मराठी) दिग्दर्शकांचा उल्लेख करत, “नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करूनच आपण अनेक हिट सिनेमा दिले, नवीन दिग्दर्शकाकडे रिस्क घेण्याची क्षमता असते. मराठी चित्रपटात काम करण्याची तयारी फक्त चित्रपटाची कथा चांगली हवी” असे म्हटले.







