ayodhya ram mandir : पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छतातून गाभाऱ्यात टपकू लागले पाणी, मुख्य पुजाऱ्यांचा दावा

0
18
ayodhya ram mandir : पहिल्याच पावसात राम मंदिराच्या छतातून गाभाऱ्यात टपकू लागले पाणी, मुख्य पुजाऱ्यांचा दावा


सत्येंद्र दास यांनी म्हटले की, मंदिर परिसरात जी छोटी मंदिरे बनवण्यात आली आहेत, त्यामध्येही पाणी जमा झाले. राम मंदिराच्या बांधकामात कोठे कमतरता राहिली, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी म्हटले की, एकतर राम मंदिरात साचलेल्या पाण्याच्या विसर्गाची व्यवस्था नाही. त्यातच मंदिराच्या छतातूनही पाणी पाझरु लागले आहे. राम लल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दावा केला की, बांधकामात हलगर्जीपणी झाला आहे. रात्री पाऊस झाल्यानंतर जेव्हा सकाळी पुजारी पूजा करण्यासाठी मंदिरात गेले तेव्हा सगळीकडे पाणी जमा झाल्याचे दिसले. मोठ्या मुश्किलीने मंदिरातील पाणी बाहेर काढले गेले.



Source link