
हा जनतेच्या मताचा अनादर ठरेल – आतिशी
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणं बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि दिल्लीच्या जनतेच्या इच्छेच्या विरोधात असेल, असा इशारा आतिशी यांनी भाजपला दिला. दिल्लीच्या जनतेनं अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला स्पष्ट कौल दिला आहे, याकडं त्यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे दिल्लीच्या जनतेत प्रचंड संताप असून लोकसभा निवडणुकीत लोक भाजपला सडेतोड उत्तर देतील, असा दावा आतिशी यांनी केला आहे.






