
रूपाली आणि आशिषने कोलकत्यामध्ये आपल्या जवळच्या मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये रजिस्टर्ड लग्न केले. ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. आशिष आणि रुपाली यांची भेट कशी झाली? हा प्रश्न विचारला असता आशिष म्हणाला की, “ही खूपच मोठी स्टोरी आहे पुन्हा कधीतरी सांगेन. या वयात दुसऱ्यांदा रूपालीशी लग्न करून फारच वेगळं वाटत आहे. वयाच्या या टप्प्यावर रूपालीची साथ मिळाली आहे आणि त्याबाबत एक वेगळीच भावना आहे, असंही आशिषने म्हटले आहे.”








