
जींथ येथील सभेमध्ये भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. आज भाजपला सर्वात मोठा धोका आम आदमी पक्षाकडून आणि माझ्याकडून असल्याचे देखील अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.
हरियाणा : दिल्लीचे मुख्यमंत्री (Delhi CM) व आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी जाहीर सभेमध्ये आपण मागण्या पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून (Political News) राजीनामा देईल असे सांगितले. जींथ येथील सभेमध्ये भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. आज भाजपला सर्वात मोठा धोका आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party) आणि माझ्याकडून असल्याचे देखील अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.
भाषणामध्ये आपल्या पाच मागण्या पूर्ण झाल्यास राजकारणामधून बाहेर पडणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. या पाच मागण्याची यादी अरविंद केजरीवाल यांनी बोलून दाखवली. मागण्याबद्दल बोलताना केजरीवाल म्हणाले, मी राजकारणामध्ये सत्तेसाठी आलो नाही… मी इथे पैसा कमवण्यासाठी किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्री बनण्यासाठी देखील आलेलो नाही. माझ्या मागण्या पूर्ण केल्या तर मी राजकारण सोडेल असे देखील केजरीवाल यांनी सांगितले.










