
काय म्हणालं न्यायालय?
अटकेची भीती वाटत असेल तर अटकपूर्व जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात का गेला नाहीत, असा प्रश्न न्यायालयानं केजरीवाल यांना केला. तुम्ही चौकशीला सामोरं जात नाही. कुठलाही कॉल घेत नाही. जोपर्यंत कॉल अटेंड करत नाही, तोपर्यंत तपास यंत्रणेला कोणती माहिती हवी आहे हे तुम्हाला कसं कळणार? ऑक्टोबर महिन्यापासून ईडी तुम्हाला समन्स बजावत आहे. मग तुम्ही आतापर्यंत कारवाईला आव्हान का दिलं नाही? तुम्हाला अटकपूर्व जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्यापासून कोणी रोखलं होतं, असा सवाल खंडपीठानं केला.







