
केजरीवालांचे वकील म्हणाले…
केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी उच्च न्यायालयात ईडीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. कनिष्ठ न्यायालयानं आमचं म्हणणं अविरत ऐकायला हवं होतं आणि आदेश देताना सविस्तर निबंध लिहायला हवा होता, ही ईडीची भूमिका निंदनीय व दु:खद आहे. एखाद्या खासगी संस्थेनं अशी भूमिका मांडली असती तर ठीक होतं. सरकारी यंत्रणांकडून हे अपेक्षित नाही. मात्र, एक घटनात्मक संस्था म्हणून ईडीची ओळख गेल्या अनेक वर्षांपासून हरवली आहे, असं सिंघवी म्हणाले.







