
त्याचबरोबर ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या वारसीच्या चित्रपटाची निर्मिती बच्चन यांच्या कंपनीनं केली होती. यावरही अर्शदने भाष्य केलं होतं. अर्शदनं एका मुलाखतीतून त्याविषयी सांगितलं. अर्शद म्हणाला, ‘मला त्यानंतर कुठल्याही चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली नाही त्याचबरोबर कुठलंही सहकार्य मिळालं नाही. त्यामुळे मी तसं का म्हणावं?’ असा प्रश्नही अर्शदने केला होता. अर्शद शेवटचा अक्षय कुमार आणि कृती सेनॉन यांच्या ‘बच्चन पांडे चित्रपटात दिसला होता.






