
अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही. पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन अप्पी कलेक्टर झाली आहे. त्यानंतर तिच्या आयुष्यात अर्जुनची एण्ट्री झाली. त्यांनी एकमेकांसोबत लग्न केले. लवकरच अप्पी एका बाळाला जन्म देणार आहे. मात्र, अशातच अर्जुनवर अनेक आरोप झाले आहेत. त्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत अनपेक्षित वळणे येत असल्याचे पाहायला मिळाले.






