
… तेव्हाच क्रांती होणे शक्य!
अनुराग कश्यप म्हणाला की, ‘आपण आपल्या लढण्याचा मार्ग बदलला पाहिजे. लोकांना त्यांच्या फोनवर तेच ऐकायला मिळते जे त्यांना ऐकायचे असते. आणि ज्यांच्याकडे याचं नियंत्रण आहे, ते आपल्यापेक्षा चार पावले पुढे असतात. त्यांचे तंत्रज्ञान अधिक प्रगत आहे, ते खूप स्मार्ट आहेत, त्यांना समज आहे. आपण सगळेच अजूनही भावनिकरित्या मूर्खच आहोत. ज्याप्रकारे स्वदेशीच्या आंदोलनात विदेशी कपडे जाळले गेले होते, त्याचप्रकारे जेव्हा लोक असा फोन फेकून देतील, तेव्हाच क्रांती होणे शक्य आहे’.