
अनुपम खेर यांनी करिअरच्या सुरुवातीला खूप संघर्ष केला आहे. अवघे ३७ रुपये घेऊन अनुपम खेर मुंबईत आले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी रेल्वे स्टेशनवर रात्र काढली होती. अनुपम खेर यांना त्यांच्या लूकमुळे कुणीही काम देत नव्हते. सुरुवातीच्या तीन वर्षांत त्यांना कोणीही काम दिले नव्हते. अशा कठीण वेळी एका क्षणी त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यानंतर ते महेश भट्ट यांना भेटले. महेश भट्ट यांनी त्यांना ‘सारांश’ चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. ‘सरांश’ चित्रपटाने अनुपम खेर यांच्या करिअरला कलाटणी दिली.