
कलर्स मराठीवरील ‘अंतरपाट’ या लोकप्रिय मालिकेत गौतमी आणि क्षितिजचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पारंपरिक पद्धतीने पार पडला आहे. त्यांचा विवाह विशेष सोहळा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या विशेष सोहळ्यानंतर त्यांनी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच क्षितिज गौतमीला त्याचं जान्हवीवर प्रेम असल्याचं सत्य सांगणार आहे, तर दुसरीकडे आता त्यांच्या नात्यातील नवा अध्याय सुरू होणार आहे. दोघांमध्ये मैत्रीचं नातं फुलणार आहे.







