
अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान लावण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे कमान उभारण्यावरून दोन गट आमनेसामने आले आहेत. कमान उभारण्यावरुन निर्माण झालेला वाद चिघळल्यामुळे सोमवारी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांची बैठक झाली.



