
यावेळी अमिताभ बच्चन यांनी जीवनात संघर्ष करणाऱ्या लोकांसाठी एक संदेश दिला. त्यांनी लिहिले की, ‘आपण सर्वांनी जीवनात कधी ना कधी अपयशाचा सामना केला आहे, निराश झालो आहोत आणि पराभूत होणे म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण, विजय मिळाल्यावर कसे वाटते हे कळणे सर्वात मोठे आव्हान आहे, ज्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. दाराला कुलूप असल्याचे आपल्याला तेव्हाच कळते, जेव्हा आपण आत जायचा प्रयत्न करतो. आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतात आणि हा जीवनातील सर्वात मोठा धडा देखील आहे.’







