मालवीय यांच्यापासून पीडित असलेल्या महिलांना न्याय मिळाणं गरजेचं आहे. निष्पक्ष चौकशीसाठी मालवीय यांना सध्याच्या पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी श्रीनेत यांनी केली आहे. मालवीय सध्या भाजपमध्ये ज्या पदावर आहेत, ते पद अत्यंत प्रभावी आहे. हे सत्तेचं पद असून त्याची स्वतंत्र चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळं जोपर्यंत त्यांना पदावरून हटवलं जात नाही, तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही, असं श्रीनेत यांनी म्हटलं आहे.







