
तर, भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याचं कारण सांगताना अक्षय कुमार म्हणाला की, ‘मी मनाने याच देशाचा नागरिक होतो. मी भारतीय हिंदू आहे. कामाच्या ओघात पासपोर्ट बदलणं मी विसरून गेलो. काही काळानंतर चित्रपट चांगले चालू लागले होते. मात्र, नंतर लोक सातत्याने ट्रोल करू लागले. एका कागदाच्या तुकड्याने इतका फरक पडतो, याची कल्पना नव्हती. तेव्हा वाटलं की, आता गोष्टी वेळीच बदलून घ्यायला हव्यात. मी भारतीय आहे. मी भारतीय अन्न खातो, इथेच राहतो आणि कर देखील भरतो. तरीही लोक मला मी कॅनडाचा आहे, असं म्हणत होते. मग, मी पुन्हा सगळे आवश्यक बदल करून घेतले.’






