
अनेक मीडिया मुलाखतींमध्ये अक्षयने कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. अक्षय कुमार म्हणाला होता की, ‘भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही कमावले आहे, ते मी इथे राहून कमावले आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला परतण्याची संधी मिळाली आहे. पण, लोक जेव्हा माझ्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह लावतात तेव्हा वाईट वाटते.’








