
३१ वर्षांपूर्वी अजमेरमधील २५० मुलींसोबत नेमके काय झाले हे ‘अजमेर ९२’ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर थरकाप उडवणारा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंह यांनी केले आहे. तसेच याची निर्मिती नवरेश्वर तिवारी यांनी केली आहे. २१ जुलै रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात करण शर्मा, सुमित सिंग, जरीना वहाब, ब्रिजेंद्र काळ, सयाजी शिंदे आणि मनोज जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.







