
अजित पवार काय म्हणाले?
नुकतीच अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते, पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालते. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचे नसते. मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. पण त्यावेळेस केले गेले. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झाले ते एकदा बाण सुटल्यासारखे होते. आज मला माझे मन सांगत आहे की, तसे व्हायला नको होते.’







