
पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्यामुळं राज्यात पीएचडी करणारा विद्यार्थीवर्ग नाराज झाला असल्याचे दिसतय. ‘पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत..’, अशा प्रकारचं वक्तव्य अजित पवार यांनी काल, नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत केलं होतं. दरम्यान, अजित पवार यांनी राज्यातील विद्यार्थ्यांची अशाप्रकारे थट्टा करू नये, असा सल्ला विरोधी पक्ष नेत्यांनी अजित पवार यांना दिला आहे.




