
पवार यांनी पत्रात लिहिले आहे की, सन १९९१ पासून मी राजकीय जीवनात ख-या अर्थाने वाटचाल करीत आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली या बाबत अनेकदा चर्चा झाली. खरतर मला राजकारणात संथी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्या मुळे कुटुंबिय म्हणून मला ती संधी मिळाली.