
नवतरूणांना हे जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत. याच गेमला काही राज्यात बंदी आहे, आपण मात्र बिनधास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरूणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे, हे पण आपण सांगितले पाहिजे. आणि हाच गेम तुमच्या आजुबाजूचे किती मान्यवर खेळतात, हे पण आपण पाहीले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरूणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अशा जाहिराती करून नवतरूणांना काय संदेश देत आहात, हे पण सांगितले पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल, तर हाच उद्देश किती योग्य आहे? या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा व आपण ही जाहिरात बंद करावी. तसेच नवतरूणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावे ही विनंती.’








