
अजय बारस्कर यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुकाराम महाराज व सरकारच्या आडून अजय बारसकर मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. हा सरकारचा ट्रॅप असून बारस्कर भोंदू महाराज आहे. सरकारने बारस्कर यांना हाताशी धरून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.