
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात मोलमजुरी करून काम करणाऱ्या तीन तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. शेळी आणि कबुतरं चोरल्याच्या संशयावरून गलांडे वस्तीवरील काही लोकांनी तरुणांना मारहाण केली आहे. युवराज गलांडे, नानासाहेब गलांडे, मनोज बोडखे आणि दुर्गेश वैद्य अशी पीडित तरुणांची नावं आहे. आरोपींनी या तरुणांचे कपडे काढून त्यांना झाडाला उलटे टांगले. त्यानंतर चोरीविषयी विचारणा करण्यात आली. त्यानंतर या घटनेची माहिती समजताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणांना कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.




