Agriculture | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कांद्यावरची निर्याद बंदी रद्द | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
Agriculture | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कांद्यावरची निर्याद बंदी रद्द | Navarashtra (नवराष्ट्र)


शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कांद्यावरची निर्याद बंदी रद्द

कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली आहे. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. पण ही मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय हटवला आहे. त्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दिल्ली:  केंद्र सरकारने (Central Govt) शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लावण्यात आलेली कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने कांद्याच्या निर्यातीला हिरवा झेंडा दाखवला आहे. देशातील कांद्याच्या किंमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली होती. 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी लागू करण्यात आली होती. पण ही मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय हटवला आहे. त्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रासह गुजरातमध्ये कांद्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवली आहे. केंद्र सरकारने 3 लाख मॅट्रिक टन कांदा निर्यातीला मंजूरी दिली आहे. तर बांगलादेशातून 50,000 टन कांद्याच्या निर्यातीला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना देशातील कांद्याचे उत्पादन आणि साठ्याविषयी माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व  मनसुख मांडविया या दोघांमधील चर्चेनंतर बंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.






Source link